ठार झालेल्या दहशतवाद्यांना शहीदाचा दर्जा!   

पाकिस्तानचे शेपूट वाकडेच...

इस्लामाबाद : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांना शहीदाचा दर्जा दिला आहे. यावरुन, पाकिस्तानचे शेपूट वाकडेच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर विनाकारण सातत्याने गोळीबार केला जात होता. भारताने पाकिस्ताची चहूबाजूने कोंडी करतानाच ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केले. यामुळे, पाकिस्तान अधिकच बिथरला आहे.
 
२६/११ हल्ल्यानंतर पाकिस्तानने अजमल कसाब हा पाकिस्तानी नागरिक नसल्याचे म्हटले होते. आता त्याने दहशतवाद्यांना शहीदाचा दर्जा दिला आहे. विशेष म्हणजे, भारताला कारवाईपासून रोखण्यासाठी पाकिस्तानने जगभरात याचना केली होती. 

Related Articles